भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस


भारताचे माजी प्रधानमंत्री आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांचे आज म्हणजे 25 डिसेंबर ला वाढदिवस होय. वाजपेयी याना आधुनिक राजकारणाचा भीष्म पितामह चा रूपात ओळखले जाते. ते आपल्या भाषणाने सगळयांचे मन मोहून घेत.

विरोधक देखील त्यांच्या भाषणा मुळे आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा कडे आकर्षित होत, त्यांना मान सन्मान देत. आज त्याचा वाढदिवसा निमित्य अटल जी बद्दल काही रौचक गोष्टी ज्या सहसा कोणाला माहिती नाहीत.




अटलजी बाळासाहेबां सोबत


1)जन्म

अटलजींच जन्म हा ग्वालियर मध्ये झालं, पण त्यांच गाव बटेश्वर हे होत जे आगरा जवळ आणि यमुना नदी किनारी बसले आहे. बटेश्वर हे गाव तेथील डाकुं मुळे कुख्यात होत, पण अटलजी नी त्या गावची छवी बदलून त्या गावाला शिवमंदिरांमुळे विख्यात केलं आहे.


2)साहित्य आणि कवितेचं बाळकडू

लहानपणा पासूनच साहित्य आणि कवितेचं बाळकडू अटल जी यांना मिळालं. यांचे वडील कृष्ण बिहारी हे संस्कृत भाषाचे आणि साहित्याचे विद्वान होते. त्यांनी घरात खूप साऱ्या पुस्तकांचं संग्रह केला होता. त्यांचा मुळेच अटल जी देखील पुढे चालून कविता करायला लागले.

3)वडील शिकले सोबत

जेव्हा अटलजी कानपुर च्या डीएवी कॉलेज मध्ये लॉ च्या डिग्री साठी ऍडमिशन घेत होते तेंव्हा त्यांचा वडलांना देखील लॉ शिकण्याचा मोह झाला. मग काय अटलजीं आणि त्यांचा वडलांनी एकत्रच लॉ ची डिग्री पूर्ण केली आणि अटलजी अशे नशिबानं ठरले ज्यांनी वडिलांसोबत एकत्र शिक्षण घेतलं.

4)अगोदर केली पत्रकारिता

अटल जी नी राजकारण अगोदर पत्रकारिता पण केली आहे. ते पांचजन्य पत्रिका मध्ये संपादक म्हणून काम केलं आहे. या सोबत अश्या खूप साऱ्या वृत्त पत्रिकांमध्ये संपादक म्हणून काम केलं आहे.


5)खाण्याचा छंद

त्यांना लहानपणा पासूनच नवनवीन पदार्थ खाण्याची आवड होती. ते कोठल्या नव्या शहरात गेले तेंव्हा त्या शहरातील सर्वात चांगला आणि प्रसिद्ध खाद्य पदार्थ खात असत. ते लोकसभा च्या कँटीन मधले जेवण जेवत नसत त्यांचा साठी घरातून डबा येत असे.

6)शांत स्वभाव

अटलजींच स्वभाव शांत होत. त्यांना कोणी कधी रागात असलेलं पहिल नाहीे. ते त्याचा सोबत काम करणाऱ्याला कधी रागावत पण नसतं. पण जे त्याचा जवळचे होते त्याना अटलजींचा चेहरा बघूनच कळत असे कि काही तरी चुकलंय किंवा त्यांना काहीतरी आवडले नाही ते.

अटलजी आणि श्री नरेंद्र मोदी

7)हिंदीत भाषण

ते देशातील पहिलेच नेते ज्यांनी 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रा च्या सभेत हिंदीत भाषण दिल. या अगोदर कोणी तिकडे हिंदी मध्ये भाषण दिले नव्हते. अटलजी यांनीच हिंदीला संयुक्त राष्ट्रांत ओळख मिळवून दिली.

8)गैर काँग्रेसी अधिक काळ राहिले पंतप्रधान

अटलजी हे भारताचे तीन वेळा पंतप्रधान राहिले आहेत. नेहरू यांचा नंतर असे करणारे ते एकटेच. ते 9 वेळा लोकसभेत निवडून गेले. एवढंच नाही तर ते नेहरू आणि इंदिरा गांधी नंतर सर्वात जास्ती काळ गैर काँग्रेसी पंतप्रधान राहिले.

9)निर्भीड व्यक्तिमत्व

अटलजी आणि कलाम चर्चा करत असताना

ते धाडसी निर्णय घ्यावयास अजिबात घाबरत नसत. भारताने 11 मे 1998 रोजी पोकरण येथे अणू चाचणी घेतली. त्या वेळी अटलची यांचं सरकार होत. यामुळे सर्व विकसित देशांनी भारतावर खूप प्रकारचे निर्बंध लादले. याची कल्पना असताना अटलजींनी भारताला नुक्लिर स्टेट बनवायला हे जोखीम घेतली. त्यांचा काळातच अग्नी 2 आणि आणू यांची यशस्वी चाचणी भारताने घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या